संपादकीय

मोठी बातमी | लवकरच पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळेच्या वाजणार घंटा

 

मुंबई | राज्यातील पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग कधी सुरु होणार अशी विचहरण पालकवर्गाकडून केली जात होती. आता लवकरच राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्यासाठी आरोग्य विभागाची कोणतीही अडचण नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. येत्या १० दिवसांमध्ये मुख्यमंत्री आणि कॅबिनेटच्या बैठकीतयासंदर्भातील अंतिम निर्णय होईल. असेही आरोग्यमंत्री म्हणाले.

पहिली ते चौथी यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ते बऱ्यापैकी जाऊन संसर्गित होणार नाहीत याची काळजी घेत त्यांना आपण शाळेमध्ये येऊन दिलं पाहिजे. पहिली ते चौथीचे वर्ग सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन सुरु करण्यास परवानगी द्यावी असं मत चाईल्ड टास्क फोर्सनं मांडलं आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आणि कॅबिनेटला आहे.

आरोग्य विभागाची पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यास कोणतीही अडचण नसून यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्यात सध्या ७००-८०० रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर चांगला आहे. पालकांनी शाळा व्यवस्थापनावर विश्वास ठेऊन मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात संमतीपत्र द्यावं. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

Back to top button