महाराष्ट्र

हिम्मत असेल तर समीर वानखेडेंवर कारवाई करुन दाखवा, मग पुढचा कार्यक्रम आम्ही करू

 

एनसीबी अधिकारी समीर वानखडे मुंबई क्रुझ रेव्ह पार्टीवर छापेमारी करताना अटक केली आहे. आर्यन खान याला ड्रग्जचं सेवन करत असल्याचा आरोप एनसीबी’ने केला आहे. या प्रकरणानं सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच आता समीर वानखेडे यांच्या विरोधात नवाब मलिक यांनी थे कारवाई करण्याची मागणी केली आहे आता या विरोधात आमदार नितेश राणे यांनी थेट महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिले आहे. हिम्मत असेल तर समीर वानखेडेंवर कारवाई करुन दाखवा, मग पुढचा कार्यक्रम आम्ही करू, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

राणे म्हणाले की, भाजपकडून सचिन वाझेवर कारवाई करण्याची मागणी केली असता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो ओसामा बिन लादेन आहे का, असा प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला होता. आता आम्ही विचारतो वानखेडे काय दाऊद इब्राहिम आहेत का? तुम्हाला वानखेडेंवर राग आहे, तर सचिन वाझेवर इतके प्रेम का? तुमचे हप्ते घरी आणून देत होता म्हणून का?? असा प्रश्नच विचारला आहे.

पुढे बोलताना राणे म्हणाले की, शिवसेना नेहमी मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढत असते . आता मात्र मराठी माणसावर अन्याय होत असताना शिवसेना गप्प का बसली आहे. शाहरूख खान कडे इतका पैसा आहे की त्याने नवाब मलिक आणि संजय राऊत यांना भाड्याने घेतलं आहे असा टोला नितेश राणे यांनी लगावला. तसेच हिम्मत असेल तर समीर वानखेडेंवर कारवाई करुन दाखवा, मग पुढचा कार्यक्रम आम्ही करू, असा इशारा नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला दिला.

Back to top button