संपादकीय

मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा! -चंद्रकांत पाटील

 

अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते टाळा लागणारी जमनी स्वस्तात विकत घेतली हे त्यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे त्यांची एनआयएद्वारे चौकशी झाली पाहिजे. त्यांना एनआयएने तातडीने चौकशीला बोलवावं आणि मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये यांचे अनेकांचे संबंध आहेत. वोहरा कमीशन ज्यामध्ये सगळ्या राजकीय नेत्यांची नावे घेतली आहेत. वोहरा कमीशन आता सगळ्यांसाठी खुला केला पाहिजे. अशी मागणी मी केंद्र सरकारकडे करणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. वोहरा कमीशनमध्ये ९३ बॉम्बस्फोटमध्ये कोण होते, महाराष्ट्रातील टॉपचे नेते जे आहेत त्यांचे चेहरे आता उघडे पाडा.

तसेच टॉपचा नेत्याचा जर अंडर्वर्ल्डशी संबंध आहे, दाऊदशी संबंध आहे, तर मलिकांनी तरी काय करावं? त्यांनी जमीनी घेतल्या, व्यवसाय केला. एनआयएने त्यांची चौकशी करावी, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. नवाब मलिक यांना राज्यातील कोणत्याही गावात फिरू देणार नाही, असा धमकीवजा इशारा देखील चंद्रकांत पाटील यांनी मलिकांना दिला.

Back to top button