गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना; २० मे रोजी उजव्या कालव्यातून पाणी सोडणार
गेवराई, दि. १८ : गेवराई तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून पैठण येथून सुटणाऱ्या उजव्या कालव्यात दिनांक २० मे रोजी शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांचे व पाण्याच्या वापराचे नियोजन करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कालव्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याने सिंचनासाठी आवश्यक तयारी, शेतीमधील पाण्याचे मार्ग, मोटारी व इतर साधनांची तपासणी करून ठेवावी, जेणेकरून पाण्याचा योग्य लाभ घेता येईल.
दरम्यान, पाणी सोडण्याच्या वेळापत्रकात अथवा नियोजनात काही बदल झाल्यास संबंधित विभागाकडून तात्काळ माहिती देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.