📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

बिंदुसरा बंधाऱ्यामुळे बीडचा ‘ड्राय झोन’ होणार पाणीदार

बिंदुसरा बंधाऱ्यामुळे बीडचा ‘ड्राय झोन’ होणार पाणीदार
 भूजल पातळी वाढवण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर अ‍ॅक्शन मोडमध्ये
बार्शी नाका येथील पूल कम बंधार्‍याच्या कामाची पाहणी करून, काम ऑक्टोबरच्या अगोदर करण्याच्या दिल्या सूचना
बीड दि‌.२२ (प्रतिनिधी):- शहराला होणारा विलंबाचा पाणीपुरवठा आणि पावसाची ओढ यामुळे माजलगाव धरणात सध्या अवघा २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात बीड शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस झाल्यास ते पाणी नदीमार्गे वाहून जाऊ नये, यासाठी आमदार संदीप क्षीरसागर सतर्क झाले आहेत. शहरातील बार्शी नाका येथे सुरू असलेल्या पूल कम बंधार्‍याच्या कामाला गती देऊन ऑक्टोबर मध्ये परतीच्या पावसात पाणी अडलेच पाहीजे, अशा हिशोबाने कामाची गती वाढविण्याच्या सूचना आ.संदीप क्षीरसागर यांनी संबंधितांना दिल्या आहेत.
शनिवारी (दि. २२) रोजी आ. संदीप क्षीरसागर आणि माजी आ. सय्यद सलीम यांनी बिंदुसरा नदीवर सुरू असलेल्या ‘पूलकम बंधारा’ कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पूल कम बंधार्‍याच्या माध्यमातून बीड शहरातील ५ कि.मी.च्या परिघात भूजल पातळीत मोठी वाढ होणार असल्याने आ.क्षीरसागर यांनी कंत्राटदार आणि संबंधित अभियंत्यांना येत्या ऑक्टोबर महिन्यात कोणत्याही परिस्थितीत पाणी अडवलेच पाहिजे, अशा सक्त सूचना दिल्या आहेत.
चौकट
शहराची गरज ओळखून प्लॅन मध्ये अंशतः बदल
आ. संदीप क्षीरसागर यांनी सातत्याने प्रयत्न करीत हा पूलकम बंधारा मंजूर करुन आणला त्याचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान बंधार्‍याच्या अगोदरच्या प्लॅनमुळे पाणी साठवणूक कमी होत असल्याचे लक्षात येताच आ. संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा बंधाऱ्याचा प्लॅन बदलून घेतला आहे. यामुळे आता पाणी साठवणूकीत लक्षणीय वाढ होणार आहे आणि परिणामी बंधार्‍याच्या ५ कि.मी. च्या परिघात भूजल पातळीत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत बीड शहराला मोठा फायदा होणार आहे.
चौकट
शहरातील ड्राय झोन होणार पाणीदार
शहरातील काही भागात ५० ते ६० फुटावर पाणी लागतो व जवळपास १५० फूट बोअर घेतले तरी उन्हाळ्यात ही राहातं मात्र शहरातील अंकुशनगर, संत नामदेव नगर, तेलगाव नाका, दारुल उलूम ते बायपास हा भाग ड्राय झोन मानला जातो, ३०० फूट बोअर घेतले तरी पाणी लागत नाही. यामुळे आता या पूलकम बंधार्‍याने पाणी अडल्यानंतर भूजल पातळीत वाढ होऊन हा ड्राय झोन ही निश्चितपणे पाणीदार होणार आहे अशी माहिती आ. संदीप क्षीरसागर यांनी दिली.
Back to top button