देशविदेश

“सहकार क्षेत्र देशाला ५००० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवू शकते”

 

नवी दिल्ली | ‘सहकार क्षेत्रामध्ये भारताला ५००० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची क्षमता आहे. एवढेच नव्हे तर कृषी क्षेत्राला स्वावलंबी बनवण्यातही ते मोठे योगदान देऊ शकते असे विधान केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केले आहे. तसेच पुढे ते म्हणाले की, सहकार मॉडेलची अंमलबजावणी केल्यास कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा झपाट्याने विकास होऊ शकतो.

अमूलला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले की,’तुम्ही 36 लाख शेतकरी कुटुंबांपुरते मर्यादित राहू नका. आज अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. भारतात आणि जगात त्यांची कृषी उत्पादने विकण्यासाठी त्यांच्याकडे योग्य व्यासपीठ नाही. अमूलसारख्या सहकारी संस्था या कामात मदत करू शकतात का, असा सवाल त्यांनी केला. आता या दिशेने विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.’ तसेच बियाणांच्या क्षेत्रात वेळेवर संशोधन झाले नाही, असे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले.

सहकार क्षेत्रानेही या दिशेने काम केले पाहिजे. या भागात भाजीपाल्याच्या नवीन वाणांचा विकास झाला पाहिजे. याचा फायदा खासगी कंपन्यांना नसून शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही दुप्पट होण्यास मदत होणार आहे. भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात सहकार चळवळ महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ‘आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी सहकार क्षेत्र महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे.’

Back to top button