बीड

महात्मा ज्योतिबा फुले हे भारतीय इतिहासातील एक महान व्यक्तीमत्व  – पी. आय. सुभाष सानप

महात्मा ज्योतिबा फुले हे भारतीय इतिहासातील एक महान व्यक्तीमत्व  – पी. आय. सुभाष सानप
महात्मा फुले जयंतीनिमित्त जिव्हाळा बेघर निवारा केंद्रात विविध समाजोपयोगी कार्यक्रम संपन्न
बीड दि.१२(प्रतिनिधी):- अकरा एप्रिल हा दिवस भारतीय इतिहासात विशेष महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली जाते. ते केवळ एक सामाजिक कार्यकर्ते नव्हते तर एक प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि विचारवंत देखील होते. १९ व्या शतकात, जेव्हा समाज जात आणि लिंग भेदभावाशी झुंजत होता, तेव्हा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेसाठी निर्णायक चळवळ सुरू केली. आजही ज्योतिबा फुले यांचे जीवन आणि त्यांचे विचार समानता आणि सामाजिक सुधारणांसाठी काम करणाऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त, आपण त्यांचे योगदान लक्षात ठेवले पाहिजे आणि त्यांचे आदर्श स्वीकारण्याची प्रेरणा घेतली पाहिजे. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले, एक महान समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि तत्वज्ञानी, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील वाईट प्रथांचे उच्चाटन करण्यासाठी समर्पित केले. त्यांना महात्मा फुले आणि “जोतिबा फुले” म्हणूनही ओळखले जाते. अशा या महान व्यक्तीचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कटगुण या छोट्याशा गावात झाला. त्याचे वडील शेतकरी होते आणि आई गृहिणी होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिला आणि दलितांच्या हक्कांसाठी समर्पित केले. त्यांनी १८४८ मध्ये पुण्यात “बालपण विधवा विवाह प्रतिनिधक समाज” ची स्थापना केली. या संस्थेने बालविधवांच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजसुधारक म्हणून नेहमीच समाजाला योग्य मार्गदर्शन केले. सन १८४८ मध्ये, त्यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत पुण्यात पहिली मुलींची शाळा स्थापन केली. महात्मा ज्योतिबा फुले हे भारतीय इतिहासातील एक महान व्यक्ती होते असे प्रतिपादन पी. आय. सुभाष सानप वाहतूक शाखा यांनी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत व्यक्त केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि नेहमीच राहील. त्यांचे धाडस, दृढनिश्चय आणि समाजाप्रती समर्पण आजच्या पिढीसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत राहील. ज्योतिबा फुले जयंती आपल्याला त्यांच्या जीवनातून आणि कार्यातून प्रेरणा घेण्याची आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी देत असल्याचे प्रतिपादन जिव्हाळा बेगर निवारा केंद्राचे व्यवस्थापक राजू वंजारे यांनी सांगितले.
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त शुक्रवार दि.११ एप्रिल २०२५ रोजी बीड शहराच्या नवी भाजी मंडई परिसरातील जिव्हाळा बेघर निवारा केंद्रात अभिवादन, गरजुंना साडी वाटप व अन्नदान कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष सानप सर (पीआय वाहतूक शाखा), अदनान खान (दैनिक किसान, कार्यकारी संपादक) श्री राजेभाऊ गुळभिले (पीएसआय पोलीस अधीक्षक कार्यालय), येवले सर (पोलीस अधीक्षक कार्यालय), पोलीस शिपाई वाघमारे, जिव्हाळा बेघर निवारा केंद्राचे  व्यवस्थापक राजु वंजारे, संचालक अभिजित वैद्य, यश वंजारे, काळजीवाहक छाया सरोदे आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी पी.आय सुभाष सानप, वंजारे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून त्यांच्या कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश वंजारे यांनी तर आभार अभिजीत वैद्य यांनी मानले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्यसाधून जिल्हा शासकीय रुग्णालयातील इन्चार्ज सिस्टर रंजना भीमराव दाणे मॅडम यांनी साड्या वाटप केल्या तर संगीता कोंडीबा महानवर असिस्टंट मेट्रन जिल्हा शासकीय रुग्णालय, बीड यांनी अन्नदान  केले. या वेळी महिला, पुरुष नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Back to top button