विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांचे राहुल उद्योग समूह व मनसे तर्फे उत्स्फूर्त स्वागत

विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांचे राहुल उद्योग समूह व मनसे तर्फे उत्स्फूर्त स्वागत
वारकऱ्यांसाठी अल्पोपहार,चहा व पाण्याची सेवा
जामखेड प्रतिनिधी –वारकरी परंपरेचा मान राखत पंढरपूर आषाढी वारीकडे वाटचाल करणाऱ्या श्री भोलेश्वर संस्थान, मुगगाव (ता. पाटोदा, जि.बीड) येथील पालखी दिंडीचे जामखेड शहरातील राहुल उद्योग समूह व महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे शहरातील राहुल पेट्रोलियम परिसरात उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. राहुल उद्योग समूहाचे दादासाहेब (हवा) सरनोबत यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या कार्यक्रमात वारकऱ्यांना अल्पोपहार, चहा व पाण्याची मोफत सेवा करण्यात आली. दिंडीचे प्रमुख हभप ज्ञानेश्वर महाराज कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. वारकरी संप्रदायाचे कार्य समाजात अध्यात्म, सहिष्णुता आणि सेवाभावाचा संदेश पोहोचवते. याच भावनेतून हा सत्कार करण्यात आला, अशी भावना राहुल उद्योग समूहाचे संचालक दादासाहेब (हवा) सरनोबत यांनी व्यक्त केली.
यावेळी मनसे तालुकाप्रमुख प्रदिप टापरे, उपाध्यक्ष सनी सदाफुले, कुसडगावचे सरपंच बापूसाहेब कार्ले, दादासाहेब गाडे, सुनील उगले, विकास पवळ, राहुल जगताप, भाऊराव गायकवाड, सुधाकर अब्दुले, बाबासाहेब समुद्र, सागर गायकवाड, दत्ता काळे, मंडलिक दादा, संजय रेडे, राम बनकर, राजेंद्र मोहिते,दत्त जगताप, शेखर कार्ले, दादा भोंडवे, ऋषिकेश गाडे, गोपाल घायतडक यांच्यासह अनेक वारकरी , भाविक भक्त तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमात विणेकरी अंबादास भवर, समाजसेवक ज्ञानदेव खोटे, बाबासाहेब भवर, जालिंदर भवर, त्रिंबक गाडे आदी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व वारकऱ्यांनी या प्रेमळ स्वागताचा आनंद घेत आपली पुढची वारीची वाटचाल सुरू केली. जामखेड शहरात अशी सेवा देत वारकरी परंपरेचा सन्मान राखत आहे . असे गौरवोद्गार राहुल उद्योग समूहाबद्दल दिंडीचे प्रमुख हभप ज्ञानेश्वर महाराज कुलकर्णी यांनी सांगितले.



