संपादकीय
‘मविआ’ ही टायटॅनिक बोट तर भाजपची बोट सेफ नारायण राणे यांचा टोला
राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सतत महाविकास आघाडी सरकार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचयव्हर टीका करताना दिसून येत आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा पुण्यातील एका कार्यक्रमात नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे. राणे म्हणाले की, महाविकास आघाडी ही टायटॅनिक बोट आहे आणि भाजपची बोट सेफ आहे. तसेच राणे पुण्यातील सिंम्बॉयसिस संस्थेच्या संग्रहालय आणि स्मारक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेला उपस्थित होते.