संपादकीय

या कारणांमुळे होतात पती-पत्नीमध्ये सर्वाधिक भांडणे !

 

मुंबई | पती-पत्नीचे नाते हे इतर सर्व नातेसंबंधांपेक्षा वेगळे असते. यामध्ये खूप प्रेम असते आणि कधी कधी भांडणही होते. तरच नात्यातील गोडवा कायम राहतो. हे असं नातं आहे की पती-पत्नी न बोलता एकमेकांच्या भावना समजून घेतात आणि त्यामुळेच हे नातं काळानुसार घट्ट होत जातं तस्साच याच वेळेनुसार बदल सुद्धा होत असतात.

मात्र, काही जोडपी अशी असतात ज्यात प्रेम कमी आणि भांडण जास्त असते. वेळीच हाताळले नाही तर अशी नाती कधी कधी तुटण्याच्या मार्गावर येतात. जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला चांगले माहीत असेल की पती-पत्नीमध्ये काही गोष्टींवरून वारंवार भांडणे होत असतात, परंतु जर तुमचे लग्न झालेले नसेल तर ही गोष्ट जाणून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून तुम्ही लग्न कराल तेव्हा या गोष्टी लक्षात येतील.

अनेकांना ही सवय असते की ते लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात पत्नीला खूप सरप्राईज देतात. खूप भेटवस्तू देतात, पण नंतर ते सरप्राईज देणे बंद करतात. अशा परिस्थितीत महिलांना आपला नवरा बदलला आहे असे वाटू लागते आणि हे अनेकदा भांडणाचे कारण बनते. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा. अनेकांना अशी सवय असते की ते पत्नीपेक्षा मित्रांना जास्त वेळ देऊ लागतात.

अशा परिस्थितीत बायकोसोबत क्वालिटी टाइम न घालवणे हे विभक्त होण्याचे कारण बनते आणि भांडणे वाढू लागतात. त्यामुळे बायकोसोबत क्वालिटी टाइम घालवणे आणि वेळोवेळी मित्रांसोबत एन्जॉय करणे चांगले. काही वेळा प्रणयाचा शेवट पती-पत्नीच्या भांडणाचे कारणही बनतो. नात्यात पूर्वीसारखं प्रेम नसेल तर दुरावा येतो. त्यामुळे प्रणयासाठीही वेळ काढा, जेणेकरून नात्यात प्रेमाचा गोडवा कायम राहील.

बायको गृहिणी असेल तर कधी कधी असं होतं की अनेक दिवस घरात बसून तिला कंटाळा येतो. अशा स्थितीत चिडचिड वाढते आणि मारामारी सुरू होते. त्यामुळे ऑफिसमधून वेळोवेळी सुटी घेऊन पत्नीला कुठेतरी फिरायला घेऊन जाणे योग्य ठरेल, जेणेकरून तिच्या मनाचे मनोरंजन होईल.

Back to top button